Friday 12 August 2011

जात विहीन भारत बनवा जाती समृद्ध हिंदुस्थान नको

देशाची फाळणी झाली तेव्हा या देशाचे नाव democratic republic of india म्हणजे भारतीय गणराज्य असे झाले . परंतु काही लोक याला हिंदुस्थान असे संबोधत असतात . हिंदुस्थान या नावाने जगात भारताला कोठेच संबोधले जात नाही, mg भारताला हिंदुस्थान म्हणण्याचे प्रयोजनाचा काय ? भारतात बहु संख्या हिंदू आहेत म्हणून ? परंतु हाही एक गैर समाज आहे , भारतीय जन गणने  नुसार भारतात १२% मुसलमान आहेत , ५% ख्रिचन , ५% शीख आणि ४% बौद्ध आणि २% जैन समाज आहे, बहाई , पारशी , ज्यू  आणि इतर धर्मीयांची लोक संख्या ६% आहे, हि सर्व मंडळी अहिंदू आहेत , भारतात ८% लोक आदिवासी आहेत जे कोणत्याच धर्माचे नाहीत , अनुसूचित जाती १५% आहेत जे हिंदू नाहीत कारण ते हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कोणत्याच वर्णात  येत नाहीत आणि ‘अनुसूचित जाति/अनुसूचित जमाति’ (एससी/एसटी) हे शब्‍द सरकारी कागदपत्रांत भूतपूर्व अस्‍पृश्‍य जनजातींची ओळख पटविण्‍यासाठी वापरतात त्या मुळे  धर्मांतरानंतर हे सर्व  नव बौद्ध धर्मीय म्हणून गणले जातात अश्या प्रकारे ५७% समाज हा हिंदू धर्मीय नाही आणि जी राहिलेली ४३% हिंदू मधील ब्राम्हण हि जात सोडून राहिलेली जनता हि हिंदू धर्मातील शुद्र जात म्हणून गणली जाते  आणि हा शुद्र समाज सुद्धा धर्मांतर करण्याच्या मार्गावर आहे आणि जे करणार नाहीत ते आजन्म हिंदू धर्मातील शुद्र जाती मध्ये मोडले जाणार आहेत कारण यांना ब्राम्हण जाती पेक्षा श्रेष्ठ कधीच  म्हंटले जाणार नाही कारण हिंदू धर्मात अशी व्यवस्था नाही ,  त्या मुळे त्यांना आम्ही हिंदू म्हणणे हे कधीच गर्वाचे अथवा गौरवाचे वाटणार नाही वाटणार नाही ,म्हणून भारत देशातील अर्ध्या पेक्षा जास्त लोकसंख्या हि अहिंदू असताना आणि हिंदू  धर्मातील ४३% लोकसंख्येतील मोठी लोकसंख्या म्हणजे ४०% ज्यांना आपण मराठा या जातीचे संबोधतो हि हिंदू धर्मातील शुद्र या जातीत मोडत असल्या मुळे या जातींना हिंदू म्हणून मिरवण्यात काही गौरव वाटत नसावा असे दिसून येते , मग राहिले जे ३ % हिंदू धर्मातील  ब्राम्हण हि श्रेष्ठ जात यांचाच आरडा ओरडा आहे भारत देशाला हिंदुस्थान करण्याचा , मग जर हिंदू धर्मात फक्त ३% श्रेष्ठ हिंदू असतील आणि बाकीचे शुद्र असतील तर भारत देशाला हिंदुस्थान का म्हणावे कारण हिंदू धर्म हा जाती व्यवस्थेवर उभा आहे यातील जाती नष्ट झाल्या तर हिंदू या धर्माचे अस्तित्व राहत नाही आणि ३% ब्राम्हण समाजाचा हिंदू धर्म ढासलायला  वेळ लागणार नाही, त्या मुळे माझ्या भारतवासियानो जर तुमचे भारतावर प्रेम असेल तर भारत देशाला जाती मुक्त करण्याचा विचार अंगी बनवा .    

1 comment:

सत्यशोधक मराठा said...

ह्यातील मराठा समाजाने सुद्धा आता हिंदू धर्म सोडून शिवधर्माची वाटचाल सुरु केली आहे.