Saturday 13 August 2011

निर्णय दिला; पण न्यायाचे काय?

अलाहाबाद हायकोर्टाने ३० सप्टेंबर रोजी आयोध्या प्रकरणाशी संबंधित दावेदारांमध्ये समझोता होणारा निर्णय दिला. त्यानंतर सामान्य जनतेने, अनेक राजकीय पक्षांनी आणि शासनाने ‘हुश्श’ करीत सुटकेचा सुस्कारा सोडला. निर्णय संबंधित हिंदू किंवा मुस्लीम दावेदारांच्या विरोधात गेला असता, तर भावनिक आवाहनांमुळे जनता भडकविली गेली असती, अशी सर्वाचीच मानसिकता होती. याच कारणांसाठी साठ वर्षे उलटल्यावरही कोर्टाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचे, दंगली झाल्याच तर त्या आटोक्यात आणण्याची चांगली पूर्व तयारी ठेवण्याचे प्रयत्न झाले. पोलीस, एसआरपी यांची संचलने झाली. सैन्याच्या तुकडय़ा तैनात केल्या. अनेकांनी शांततेची आवाहने केली; परंतु अशा प्रयत्नांमुळे वातावरणातील ताण कमी होण्याऐवजी वाढतच होता. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाने दंगलींची भीती खरी ठरली नाही.
आता थोडं शांतपणाने या निर्णयाकडे पाहणे आवश्यक आहे. न्याय्य निवाडा करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुढील चार प्रश्नांची नि:संदिग्ध उत्तरे देणे अपेक्षित होते. १) रामाचा जन्म हिंदू दावेदाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाबरी मशिदीच्या जागीच झाला होता काय? २) राम मंदिर उद्ध्वस्त करून त्या जागी बाबरी मशीद बांधली होती काय? ३) २३ डिसेंबर १९४९ च्या रात्री बाबरी मशिदीत रामाच्या मूर्ती कशा काय अवतरल्या? ४) ‘वादग्रस्त’ वास्तू आणि तिचे आवार यांची कायदेशीर मालकी कोणाकडे आहे?
अलाहाबाद हायकोर्टाने काही अंशी न्यायालयाबाहेर होणाऱ्या समझोत्यासारखा निर्णय दिला आहे. कुठल्याही न्यायालयाबाबत समझोत्यात काटेकोर पुराव्यांची, तडजोडींच्या कारणांची किंवा समझोता न्याय्य असायची गरज नसते. कारण शेवटी तो समझोता असतो. न्यायालयाने समझोत्यासारखा निर्णय देताना बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचा, त्यातून उद्भवलेल्या दंगलींचा, बॉम्बस्फोटांचा या केसशी कसलाही संबंध नाही, प्रश्न फक्त वादग्रस्त जागेचा आहे, असे गृहीत धरल्याचे जाणवते. परंतु प्रश्न फक्त वादग्रस्त जागेचा असता तर साऱ्या देशाचे लक्ष या प्रश्नाकडे कशासाठी लागून राहिले असते? न्यायालयाच्या अशा निर्णयामुळे जरी नव्याने दंगली झाल्या नाहीत, तरी अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात आणि काही नव्याने तयार होतात.
पहिला प्रश्न दशरथ आणि कौसल्या पुत्र रामचंद्र ही ऐतिहासिक व्यक्ती होती की रामायण या महाकाव्यातील ते एक पात्र आहे, हे अलाहाबाद न्यायालयाने कोणत्या पुराव्यांच्या आधाराने निश्चित केले. दशरथ आणि कौसल्या पुत्र रामचंद्र हे महाकाव्यातील दैवी पात्र असेल, तर त्या साहित्यातील पात्राच्या जन्मस्थळाचा प्रश्न इहलोकीच्या अलाहाबाद न्यायालयात येऊच शकत नाही. साहित्य, महाकाव्य, कला यातील पात्रेदेखील श्रद्धेचा विषय ठरू शकतात; परंतु श्रद्धेला पुराव्याची गरज नसल्याने इहलोकीच्या न्यायालयाने श्रद्धा किंवा महाकाव्ये हा पुरावा मानणे अयोग्य ठरते. काही ठोस आणि निर्विवाद पुराव्यांच्या आधाराने दशरथ आणि कौसल्या पुत्र रामचंद्र ही ऐतिहासिक व्यक्ती असल्याचे न्यायालयाने मानले असेल, तर त्या व्यक्तीचे जन्मस्थान नक्की करण्यासाठी कोणते निर्विवाद पुरावे ग्राह्य धरले आहेत? तसेच जन्मस्थान म्हणजे माता कौसल्या बाळंत होताना तिने व्यापलेली २५ एक चौरस फुटांची जागा, तिचा महाल, तिचे नगर, दशरथ राजाचे राज्य, का ज्या पृथ्वीवर राजा दशरथाचे राज्य होते ती पृथ्वी, याबाबत तीनपैकी दोन न्यायमूर्ती गप्प आहेत.
बाबर सरदार मीर बंकीने १५२७ साली बाबरी मशीद बांधताना अस्तित्वात असलेले राम मंदिर पाडले, हे गृहीत धरण्यासाठी कोणते पुरावे न्यायालयाने मान्य केले आहेत, हा या संबंधातील दुसरा प्रश्न आहे. मंदिर ही शेवटी इमारत असल्याने तिची पडझड होऊ शकते. तीनपैकी दोन न्यायाधीशांचे मत मंदिर पाडूनच त्याजागी मशीद उभारली असे आहे. तेथे जे मंदिर होते, ते रामाचेच होते, यासाठीही निर्विवाद असा ठोस पुरावा आवश्यक आहे. तो कोणत्या पुरातत्वीय उत्खननातून मिळाला?
आर्कीऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने अयोध्येच्या संदर्भात आतापर्यंत पाच प्रमुख पाहण्या केल्या आहेत. १) १८६२-६३ साली कनिंगहॅम यांच्या तुकडीने अयोध्येशी निगडित बौद्ध धर्मियांच्या वास्तूंविषयी संशोधन केले. बौद्ध धर्मीय वास्तव्याचा ठळक आधार त्यांना सापडला. २) १८८९-९१ फ्युहरर यांच्या तुकडीला ११ व्या १२ व्या शतकात अयोध्येत राजपुतांचे अस्तित्व जाणवले. १९६९-७० साली ए. के. नारायणन यांना उत्खननात असे दिसले, की या भागांत बौद्ध धर्मियांच्या अस्तित्वाच्या ठळक खुणा आहेत. ४) १९७५-७६ प्रो. लाल यांच्या तुकडीने बाबरी टेकडीच्या भागांत उत्खनन केले. त्यांना इसवीसन पूर्वी तिसऱ्या शतकापासूनचे अवशेष सापडले. इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून या भागांत व्यापार उदिम असल्याच्या खुणा मिळाल्या. गुप्त साम्राज्य काळाच्या खुणा न मिळण्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे आणि ५) २००३ साली प्रसिद्ध केलेला पुरातत्वीय उत्खननाचा अहवाल उद्ध्वस्त बाबरी मशीदीच्याखाली राजपूत राजघराण्यांनी उभारलेल्या मंदिराचे अवशेष सापडले असल्याचा दावा करतो. या अहवालाच्या अचूकतेबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेतच. ते बाजूला ठेवले तरी हा अहवाल पाडलेले मंदिर रामाचेच होते, असे छातीठोकपणे सांगत नाही. न्यायालयाने हे लक्षात घेणे आवश्यक होते.
२३ डिसेंबर १९४९ रोजी रामाच्या मूर्ती मशिदीत ठेवल्या गेल्या, असे तिन्ही न्यायमूर्तीनी मान्य केले असले तरी त्याबाबत कसलेच भाष्य केलेले दिसत नाही. त्यामुळे न्यायालय तो एक दैवी चमत्कार किंवा रामाची इच्छा मानत असावे, असे दिसते. तिसरा प्रश्न याच मुद्दय़ाशी जोडलेला आहे. करसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली नसती, तर न्यायालयाने मशीद पाडून तेथील जागेची आताप्रमाणेच विभागणी करावी, असा निर्णय दिला असता का? करसेवकांनी मशीद उद्ध्वस्त केल्याने असा निर्णय देणे न्यायालयाला सोपे गेले आहे का? तसे असेल तर विवाद्य जागेवरील बांधकामाचा आधी विध्वंस करून मग न्यायालयाकडून ‘न्याय्य निर्णय’ मागण्याचा पायंडा पडू शकतो. हा पायंडा न्यायालयाला मान्य आहे काय? न्यायालयाला हा पायंडा योग्य वाटत असला, तरी तो भारतीय संविधानाशी सुसंगत आहे काय?
न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे २.७७ एकर जागेची वाटणी हिंदू (हिंदू महासभा?), निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड या तीन दावेदारांमध्ये समसमानपणे करायची आहे. ‘मीर बंकी या बाबराच्या सरदाराने इतिहास काळात केलेल्या अन्यायाचे परिमार्जन वर्तमानात मशीद पाडून करता येते,’ असे न्यायालयाने मानले आहे का? तसे मानणे न्यायालयाला न्याय्य वाटत असेल, तर संपूर्ण जागेची मालकी मूळ मालकांकडे का दिली नाही? १/३ जागेची मालकी वक्फ बोर्डाकडे कशासाठी दिली? या निर्णयात जमीन मालकीच्या संदर्भातील आणखीही एक विसंगती आहे. समजा, राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधली असली, तरी त्या मंदिराची मालकी मूळ मालकाच्या वंशजांकडे वादग्रस्त जागेची मालकी जाणे सुसंगत ठरावे. न्यायालयाला कौसल्येच्या रामाचे किंवा पाडलेल्या राममंदिराच्या मालकांचे आज हयात असणारे वंशज निश्चित करता येत नव्हते काय? तसे असले तरी ती जागा स्वयंघोषित हिंदू आणि मुस्लीम प्रतिनिधींच्या हवाली करणे न्याय्य आहे काय? हिंदू महासभा आणि निर्मोही आखाडा यांच्याकडे या जागेची मालकी केवळ ते दावेदार आहेत म्हणून जाणे उचित आहे काय? मंदिर-मालकांचे वंशज मिळत नाहीत, अशी न्यायालयाने कबुली दिली असती, तरी दावेदार हिंदू महासभा आणि निर्मोही (ऐहिक बाबींचा मोह नसणारे?) आखाडा ही मंडळी हिंदू धर्मियांची प्रतिनिधी आहेत, हे न्यायालयाने कसे ठरविले, हा चौथा प्रश्न उरतोच. भारतातील मुस्लिमांत सुन्नी पंथीयांची टक्केवारी इतरांपेक्षा बरीच जास्त असली, तरीही सुन्नी वक्फ बोर्ड हे समस्त मुस्लिमांचे या प्रश्नाबाबत प्रतिनिधित्व करू शकते हे न्यायालयाने कोणत्या आधारावर गृहीत धरले? वास्तविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा शंकराचार्याची चार पिठे किंवा सुन्नी वक्फ बोर्ड ज्याप्रमाणे हिंदू आणि मुस्लिमांचे स्वयंघोषित प्रतिनिधी आहेत, त्याप्रमाणे हिंदू महासभा आणि निर्मोही आखाडा हे स्वयंघोषित प्रतिनिधीदेखील नाहीत. मुख्य म्हणजे न्यायालयाला स्वयंघोषित प्रतिनिधित्व मान्य आहे काय?
न्यायालयाच्या निर्णयाची ही सर्व पाश्र्वभूमी लक्षात घेता, अलाहाबाद न्यायालयाने न्याय दिला का, हा पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतोच. क्षणभर गृहीत धरू या, की बाबरचा सरदार मीर बंकी याने १५२७ साली मंदिर पाडून मशीद बांधली होती; परंतु तो काळ सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अस्थिर राजेशाह्यांचा होता. लुटालूट करणे हा तेव्हाचा रिवाज होता. सोमनाथ मंदिर अनेकदा लुटले होते, सुरत लुटली होती, बंगालमध्ये ‘मराठा आला, मराठा आला’ अशी भीती दाखवून लहान मुलांना झोपविले जायचे, एवढी लुटालूट मराठा राजवटीने केली होती. अनेक बौद्ध विहारांचा विध्वंस हिंदू राजांनी केला होता. या प्रकारांचे आज समर्थन होऊ शकत नाही. त्याची वर्तमानकाळात भरपाई तर होऊच शकत नाही. मीर बंकीने मशीद बांधल्याला साडेचारशेपेक्षा जास्त वर्षे उलटली. बाबरानंतर मोगल सत्ता स्थिरावली. त्यानंतर इंग्रजांची राजवट दीडशे वर्षे चालली. यथावकाश भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत-पाकिस्तान हे दोन नवे देश अस्तित्वात आले. भारतातील संस्थाने विलीन  करवून घेतली. नंतर संस्थानिकांचे अधिकार बरखास्त केले. अनेक निवडणुका झाल्या. भारतीय स्वातंत्र्यालाही साठ वर्षे झाली. एवढय़ा काळात माणसाने थोडे जास्त सुसंस्कृत होण्याची अपेक्षा करणे रास्त आहे. राजेशाहीची जागा लोकशाहीने घेतल्यानंतर भाजपने ४००-५०० वर्षांपूर्वीच्याच मानसिकतेत राहणे पसंत केले. या राजकीय पक्षाने आंदोलन चालवून करसेवकांना मशीद उद्ध्वस्त करण्याला चिथावणी देण्याचे बेजबाबदार अघोरी कृत्य केले. त्याबाबत टीकाटिपण्णी न करता न्यायालय गप्प आहे. लोकशाहीवर, सुंस्कृततेवर आणि सहिष्णुतेवर विश्वास असणाऱ्यांनी न्यायालयांवरील विश्वास असा वाऱ्यावर उडू द्यायचा का? राजकीय पक्षांना ओंगळवाणी राजकीय गणितं सोडवत बसायला रान मोकळं करून देण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरणे आता आवश्यक आहे.

प्रकाश बुरटे ,गुरुवार, २८ ऑक्टोबर २०१०
loksatta





Friday 12 August 2011

जात विहीन भारत बनवा जाती समृद्ध हिंदुस्थान नको

देशाची फाळणी झाली तेव्हा या देशाचे नाव democratic republic of india म्हणजे भारतीय गणराज्य असे झाले . परंतु काही लोक याला हिंदुस्थान असे संबोधत असतात . हिंदुस्थान या नावाने जगात भारताला कोठेच संबोधले जात नाही, mg भारताला हिंदुस्थान म्हणण्याचे प्रयोजनाचा काय ? भारतात बहु संख्या हिंदू आहेत म्हणून ? परंतु हाही एक गैर समाज आहे , भारतीय जन गणने  नुसार भारतात १२% मुसलमान आहेत , ५% ख्रिचन , ५% शीख आणि ४% बौद्ध आणि २% जैन समाज आहे, बहाई , पारशी , ज्यू  आणि इतर धर्मीयांची लोक संख्या ६% आहे, हि सर्व मंडळी अहिंदू आहेत , भारतात ८% लोक आदिवासी आहेत जे कोणत्याच धर्माचे नाहीत , अनुसूचित जाती १५% आहेत जे हिंदू नाहीत कारण ते हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कोणत्याच वर्णात  येत नाहीत आणि ‘अनुसूचित जाति/अनुसूचित जमाति’ (एससी/एसटी) हे शब्‍द सरकारी कागदपत्रांत भूतपूर्व अस्‍पृश्‍य जनजातींची ओळख पटविण्‍यासाठी वापरतात त्या मुळे  धर्मांतरानंतर हे सर्व  नव बौद्ध धर्मीय म्हणून गणले जातात अश्या प्रकारे ५७% समाज हा हिंदू धर्मीय नाही आणि जी राहिलेली ४३% हिंदू मधील ब्राम्हण हि जात सोडून राहिलेली जनता हि हिंदू धर्मातील शुद्र जात म्हणून गणली जाते  आणि हा शुद्र समाज सुद्धा धर्मांतर करण्याच्या मार्गावर आहे आणि जे करणार नाहीत ते आजन्म हिंदू धर्मातील शुद्र जाती मध्ये मोडले जाणार आहेत कारण यांना ब्राम्हण जाती पेक्षा श्रेष्ठ कधीच  म्हंटले जाणार नाही कारण हिंदू धर्मात अशी व्यवस्था नाही ,  त्या मुळे त्यांना आम्ही हिंदू म्हणणे हे कधीच गर्वाचे अथवा गौरवाचे वाटणार नाही वाटणार नाही ,म्हणून भारत देशातील अर्ध्या पेक्षा जास्त लोकसंख्या हि अहिंदू असताना आणि हिंदू  धर्मातील ४३% लोकसंख्येतील मोठी लोकसंख्या म्हणजे ४०% ज्यांना आपण मराठा या जातीचे संबोधतो हि हिंदू धर्मातील शुद्र या जातीत मोडत असल्या मुळे या जातींना हिंदू म्हणून मिरवण्यात काही गौरव वाटत नसावा असे दिसून येते , मग राहिले जे ३ % हिंदू धर्मातील  ब्राम्हण हि श्रेष्ठ जात यांचाच आरडा ओरडा आहे भारत देशाला हिंदुस्थान करण्याचा , मग जर हिंदू धर्मात फक्त ३% श्रेष्ठ हिंदू असतील आणि बाकीचे शुद्र असतील तर भारत देशाला हिंदुस्थान का म्हणावे कारण हिंदू धर्म हा जाती व्यवस्थेवर उभा आहे यातील जाती नष्ट झाल्या तर हिंदू या धर्माचे अस्तित्व राहत नाही आणि ३% ब्राम्हण समाजाचा हिंदू धर्म ढासलायला  वेळ लागणार नाही, त्या मुळे माझ्या भारतवासियानो जर तुमचे भारतावर प्रेम असेल तर भारत देशाला जाती मुक्त करण्याचा विचार अंगी बनवा .    

जातीविरहीत समाजव्यवस्था म्हणजे बौध्द धर्म

 
जातीविरहीत समाजाच्या उभारणीसाठी आणि समताधिष्ठीत भारताच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. सोबत सात लाख अस्पृश्यांतील महारांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. संपूर्ण भारत बुध्दमय करण्याची प्रतिज्ञा पूर्वक घोषणा केली. बुध्दमय भारत म्हणजे काय? बुध्दाच्या आचार-विचारांचा भारत होय. ध्येय गाठण्याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर काळाच्या पडद्याआड झाले. डॉ. आंबेडकरांच्या पश्चात काही धर्मांतरीत बौध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी दुर्लक्षित झाले. बरीच वर्षे धम्म कांतीचा रथ जागीच थांबून राहिला.
इतिहासाचा आढावा घेतला तर  अस्पृश्यांच्या हजारो पिढ्या हिंदू धर्मांनी बरबाद केल्या. आम्हाला जनावरांची वागणूक दिली. जंबूद्विपातील, बुध्दाच्या प्रदेशातील सत्य कधी आम्हाला कळू दिले नाही. एकेकाळचा बुध्दकालीन भारत म्हणजे न्याय,समता, बंधुत्वाचा भारत होता, प्रज्ञा-शील-करुणेचा भारत होता, सत्य-अहिंसा-शांतीचा भारत होता. जातीविरहीत भारत होता, अर्हतांचा भारत होता. सम्यक संबुध्दाचा भारत होता.  आज हाच भारत जातीयतेचा, विषमतेचा, धर्मांधतेचा,जातीय दंग्याचा अनितीचा भारत असा बोलबाला झाला आहे. असा भारत कोणी केला तर भारतात चातुवर्ण व्यवस्था निर्माण करणाऱया वैदीक (मनुवादी) ब्राम्हणांनी भारतीय समाज व्यवस्थाच दूषित केली.
अनेक धर्मांची निर्मिती कथाकाव्यातून झाली आहे. पण वैदीक धर्म आणि हिंदू धर्म यात विसंगती दिसून येते. वैदीक धर्म वेद मनुस्मृती यातून तयार झाला. पुढे चातुर्वण्य व्यवस्था उदयास आली. चातुर्वण्य व्यवस्थेत हिंदू धर्म बसत नाही. हिंदू धर्माला संस्थापक नाही. प्रमाण ग्रंथ नाही. रामायण, महाभारत हिंदू धर्माचा आधार मानतात. दोन्हीही ग्रंथ राम,रावण, कौरव-पांडव यांचे युध्द प्रसंग दाखवितात. हिंदू धर्माचा आचार विचार यात नाही. हिंदू धर्माचे प्रमाण जाती व्यवस्था आहे. वर्णव्यवस्थेतही ब्राम्हणाचे स्थान श्रेष्ठच राहिले आहे. तर हिंदू धर्मातही ब्राम्हणाचे स्थान श्रेष्ठच राहिले आहे. हिंदू शब्दाचा अर्थ पारशी भाषेत हिन-शुद्र-गलिच्छ सांगितला आहे. यावरुन भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शुद्र मानलेला समाज आजचा ओबीसी हाच हिंदू होय. यावरुन हिंदू हा धर्म नाही. एक समुह आहे. अनेक जातीचा समूह आहे.जगमान्य अशा धर्मात शुदांनी प्रवेश करु नये म्हणून ब्राम्हणांनी हिंदू हा धर्म बनविला. ब्राम्हण हा हिंदू होऊ शकत नाही.हिंदू (शुद्र) वैदीक होऊ शकत नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली शुद्रांचे (ओबीसी) शोषण होत आहे. म्हणून म्हणतात कि , शोषकांचा आणि शोषितांचा धर्म एक होऊ शकत नाही. हिंदू धर्मांचे ठेकेदार ब्राम्हण आहेत. म्हणून ते धर्मांतराला व धर्म परिवर्तनाला विरोध करतात. आणि `परधर्म भयावह' असे हिंदू धर्मियांना सांगत असतात. हिंदू धर्माची पकड जातीयता, विषमता, धर्मांधता (अंधश्रध्दा) या तीन तत्वांवर आहे. म्हणून हिंदू धर्माने माणसात जाती मजबूत केल्या आहेत.
समताधिष्ठीत भारत निर्माण करण्यासाठी भारतीय संविधानाने हजारो वर्ष हक्क वंचीत राहिलेल्या दुबळ्या समाजाची गटवार रचना करुन भारतीय राज्य घटनेच्या कलम 340 प्रमाणे ओबीसी, 341 प्रमाणे अनु.जाती, 342 प्रमाणे अनु. जमाती अशी नोंद करुन अधिकार त्यांचे समाविष्ट केले आहे. यास्तव अप्पर जाती, ब्राम्हण, बनिया, राजपूत, ठाकूर, मराठा अन्य उच्च जाती खुल्या प्रवर्गात समाविष्ट केल्या आहेत. कारण याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, बौध्दिक , राजकीय सर्वांगिण विकास झाला आहे. मागासलेल्या व अविकसीत जाती, जमाती, ओबीसी यांना तशा सोयी सवलती देऊन वर आणण्यासाठी वरिल कलमान्वये राखीव हक्क ठेवले आहेत.
हजारो वर्षापूर्वी भारतात वर्णव्यवस्था होती तेव्हा कर्मावर आधारित जाती होत्या. मंदिराचा पूजारी ब्राम्हण, जोडे चप्पला बनविणारा चांभार, कपडे शिवणारा शिंपी, पुढे व्यवस्था बदलली तेव्हा जन्मावर आधारित जाती तयार झाल्या शिंप्याच्या मुलाने जोडे चप्पला बनविल्या तरी तो चांभार झाला नाही. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकात पेशवाईने शुद्र अतीशुद्रावर व स्त्रीयावर अन्याय केला. समाजव्यवस्था फारच बिघडली होती. अशातच अनेक समाज उदयास आले. आर्य समाज, ब्राम्हणसमाज, महात्मा फुलेचा सत्यशोधक समाज, यातून थोड्या प्रमाणात समाज सुधारणा होत गेल्या पण जातीव्यवस्था संपविता आली नाही. तसा प्रयत्नही झाला नाही. बौध्द धर्मियांना जाती व्यवस्थाच मान्य नाही. कारण बौध्द धम्मात जात नाही, समता आहे. जात आहे तेथे नीती नाही. जात नाती तोडते, द्वेष भावना पसरविते. म्हणून बौध्दांना जातीव्यवस्थाच मान्य नाही.
आता 2011 च्या जनगणनेत बौध्दांनी (धर्मांतरीत) जात लिहावी  की, नाही हा नवा वाद आहे. काहींच्या मते जातीच्या रकान्यात बौध्द  लिहावे व धर्मांच्या रकान्यात बौध्द लिहावे. काहीच्या मते जातीचा रकाना कोरा सोडावा व धर्मांच्या रकान्यात बौध्द लिहावे. तर काहीच्या मते जातीच्या रकान्यात महार लिहावे व धर्माच्या रकान्यात बौध्द लिहावे. खरे तर बौध्द ही जात नाही. बौध्द हा धम्म आहे. जातीचा संस्थापक गौतम बुध्द नाही. धम्म म्हणजे जीवन जगण्याची पध्दत किंवा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आनंदानी एकदा तथागत बुध्दाला विचारलं तथागत तुमच्या पश्चात आमचा शास्ता कोण? तेव्हा तथागत बुध्दांनी उत्तर दिलं तथागताच्या पश्चात धम्मच तुमचा शास्ता आहे. मार्गदाता आहे. बौध्द ही जात होऊ शकत नाही.
आजची भारतीय संवैधानिक व्यवस्था व त्यानुसार देशाचा चालणारा राज्य कारभार यानुसार जात राहणार आहे. आता जातीव्यवस्था बदलवायची झाल्यास घटना दुरुस्ती करावी लागेल. हे शक्य नाही. चीन, जपान, ब्रम्हदेश या देशात बुध्द धम्मातील कायदे पाळतात. भारतात संविधानावर आधारित कायदे आहेत आणि हे  सर्वांना बंधनकारक आहेत. संविधानाला प्रथम मानावे लागते,संविधानाचा आदर करावा लागतो. आज धर्मांतरीत बौध्द असतील त्यात कोणी कुणबी, बौध्द असेल, कोणी महार बौध्द असेल, कोणी ब्राम्हण बौध्द असेल, बौध्द धम्मात प्रवेश केल्यावर मात्र सगळ्याचे व्यवहार धर्माप्रमाणे चालतात. कोणी जात पाळत नाहीत. जात व भेद विसरुन जातात. एवढं नक्की.
प्रत्युत-समुत्पादात बुध्दाने जातीचा अर्थ केलेला आहे. जसे `उत्पादान पच्चया भवो, भवो पच्चया जाती, जाती पच्चया जटा मरण, शोक परिदेव दुःख दोमनस्य पायासा संभवंती.'
अर्थ : उत्पादानामुळे भवाची उत्पत्ती होते, भवामुळे जातीचा उदय होतो. जातीमुळे म्हातारपण आणि मरण येते. जाती म्हणजे जन्म,जन्मालाच बुध्दानी जाती म्हटले आहे. म्हणून आपली जात महार, मांग, कुणबी, ब्राम्हण नाही. मनुष्य ही जात आहे. म्हणजेच मनुष्य जन्म आहे. पृथ्वी तलावर जाती विषयीचे वर्गीकरण केले तर तीन जाती (जन्य) संभवतात. मनुष्य, प्राणी, पशु म्हणजेच मनुष्य जन्म, पशु जन्म, पक्षी जन्म यात नर-मादी वेगळा जन्म (जाती) दाखविला नाही.
हिंदू धर्म हा धर्म नाही. जाती जातींचा समुह आहे. बौध्द धर्मात जाती नाही. आमची संवैधानिक जात महार आहे. पण धर्माने आम्ही महार नाही. आमची जात मनुष्य आहे व धर्म आमचा बौध्द आहे. मार्गदर्शक धम्म आहे. गुरु किंवा शास्ता तथागत भगवान बुध्द आहे. आमचा धम्म गंथावरुन नाही. आचारा-विचारांवरुन सिध्द करु या. कोणी काहीही लिहावे त्यांचा  तो संवैधानिक स्वतंत्र अधिकार आहे.

राजजीवन वाघमारे