Sunday, 22 May 2011

म. फुले यांनी मांडलेली बहुजन समाजाची संकल्पनाच मोडीत निघण्याची भीती आहे...

- प्रताप आसबे


महाराष्ट्रातील जाती जातीत असलेले सामंज्यस्य कसे धोक्यात आले आहे, याचे बटबटीत स्वरूप लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होते. खरे म्हणजे सामंजस्य धोक्यात आले यापेक्षा जाती जातीत असुया आणि तेढ निर्माण झाली, हे म्हणणे सयुक्तिक ठरेल. यातून राज्याचे सामाजिक स्वास्थ्य कसे बिघडले आहे, हे स्पष्ट होते. निवडणुकांचे निकाल काहीही लागोत, पण सामाजिक स्वास्थ्य बिघडणे हे बरे लक्षण नाही.

राज्यात एकेकाळी स्पृश्यास्पृश्य असे भेद होते. स्पृश्यांनी अस्पृश्यांना गावकुसाबाहेर लोटून जगण्याचे सगळे अधिकार आपल्याकडे केंदित केले होते. सत्ता, संपत्ती आणि ज्ञान यावर मूठभरांची मक्तेदारी होती. स्पृश्यांची सेवा आणि त्यांनी टाकलेल्या तुकड्यांवर त्यांना गुजरण करण्याचा अधिकार होता. त्यामुळे अतिशय हीन आणि लाचारीचे जीणे हा समाज जगत होता. गावकुसाच्या परिघामध्ये राहणाऱ्या स्पृश्यांमध्येही उच्चनीच जातींची उतरंड होती. तीही शोषणावर आधारित होती. एकूण समाजव्यवस्था हीच पराकोटीच्या शोषणावर आधारित होती. पुढे समाजसुधारकांनी अविरत प्रबोधन करून आणि वर्षानुवषेर् लढे देऊन ती व्यवस्था खिळखिळी केली. समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वज्ञानाच्या आधारावर नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शोषणाला खतपाणी घालणाऱ्या रूढी आणि प्रथापरंपरांवर हल्ले चढविले. ज्यांच्या हातात सगळे अधिकार एकवटले होते त्या शाशक आणि शोषक जातींनीही निकराचा प्रतिकार केला. तेव्हा सुधारकांनी शोषितांमधील भेदाभेद आणि दुरावे नष्ट करून त्यांच्या एकजुटीची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अठरापगड जाती, बारा बलुतेदार, स्पृश्य -अस्पृश्य आणि विशेषत: स्पृश्यांमधील शेतकरी, कष्टकरी जातींची एकजूट उभी राहिली. त्या एकजुटीलाच बहुजन समाज असे म्हटले जाई. बहुजन समाजाची व्याख्या मांडली ती महात्मा जोतिबा फुले यांनी. पाच एकराखाली असलेले सगळे स्पृश्यास्पृश्य आणि दीनदलित कष्टकरी यांचा समावेश त्यांनी बहुजन समाजात केला होता. पुढे हेच बहुजन स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. त्यामुळे चळवळीला बळ लाभले. सामाजिक सुधारणांबरोबर स्वातंत्र्यासाठी झालेल्या राजकीय चळवळीनेही लोकांना मूलभूत हक्कांची जाण आली.

स्वातंत्र्योत्तर काळात सत्ता आली, बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटने तील  कायद्या  मुळे  सगळे समान ठरले. ती थेट बहुजन समाजाच्या हातात गेली. नवीन कायदे झाले. विकासाला गती मिळाली. बहुजन समाजातील नेते सर्व जातीजमातींना बरोबर घेऊन कारभार करत होते. सत्तेच्या या राजकारणात वतनदार मराठ्यांचा फारसा सहभाग नव्हता. खरेतर त्यांना शिरकाव करायला जागाच नव्हती. निवडणुकांच्या राजकारणात बहुजन समाजातील सामान्य जातीजमाती आणि बलुतेदार घटकातील कार्यकर्ते सुद्धा  इतके तगडे होते की राजघराणे आणि पंचकुळीतील उमेदवारांनाही ते बघता बघता चारीमुंड्या चीत करत होते. सत्तेच्या समन्यायी वाटपाचा हा समतोल बरीच वर्ष राज्यात कायम होता. पुढे सत्तेचे केंदीकरण, त्यातून कलेकलेने वाढत गेलेली माया, विचाराच्या बांधिलकीला येऊ लागलेली ढिलाई, सत्तेसाठी हव्या तशा केलेल्या तडजोडी आणि सत्तेची अमर्याद हाव यामुळे बहुजन समाजाच्या हाती असलेली सत्ता धनदांडग्यांच्या हाती कधी गेली हे कळले नाही. त्यात सत्तेच्या समन्यायी वाटपाचा समतोलच ढळून गेला.

बहुजन समाजात आता मराठा, माळी, धनगर, वंजारी, कुणबी, कोष्टी अशा अठरापगड जातींनी आकार घेतला होता. दलितांतही आता बौद्ध, मातंग, चांभार या जातींना जातीची प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे या सर्वांनी बनलेला बहुजन समाज मिथक ठरला आणि मराठा, माळी, धनगर अशा जाती वास्तव म्हणून उरल्या.

सत्तेत असलेले मराठे सर्वंकष सत्तेसाठी आंधळे झाले. आपण, आपला मुलगा, सून, नातू, भाऊ, भाचा या सर्वांवर सदासर्वकाळ सत्तेचे छत्रचामर राहिले पाहिजे. पंचकुळ्यांना त्याची भावकी, देशमुखाला त्याची देशमुखी आणि पाटलाला पाटलाशिवाय सगळेच शत्रू वाटायला लागले. सत्तेत असलेल्या माळ्यांना माळ्यांच्या पलीकडचे कोणी दिसेना. धनगरांचे लाभाथीर् धनगरच ठरायला लागले. ही अधोगती इथपर्यंतच नाही तर पोटजातीपर्यंत गेली. हिंदुत्वाच्या वाऱ्याने दलितांत हिंदू दलित आणि बौद्ध अशी फूट पाडली.

वातावरण अशारीतीने कमालीचे कलुषित झाले होते. तशात ज्या मराठ्यांना प्रयत्न करूनही सत्तेत शिरकाव करता येत नव्हता, अशा असंतुष्टांनी मराठ्यांना राखीव जागा देण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. सत्ता, संपत्ती, जमीनजुमला, नोकऱ्या यामुळे प्रबळ झालेल्या जातीनेच राखीव जागा मागायला सुरुवात केल्यावर बहुजन समाजातील कलहाला तोंडच फुटले. मराठ्यांच्या विरोधात बहुतेक ओबीसी जाती एक झाल्या. ओबीसी जाती आपल्या विरोधात एकत्र येताहेत हे पाहून मराठ्यांनीही काही ठिकाणी जातीच्या पातळीवर एकत्र येऊन धडा शिकविण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाचे विदारक स्वरूप पाहायला मिळाले.

वास्तविक मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला बहुतेक मराठ्यांचा विरोध असल्याने हा समाजही दुभंगलेलाच होता. त्याचे प्रत्यंतर बीड आणि नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये केवळ माळी समाजाच्या हितसंबंधानाच प्राधान्य दिले जाते, यामुळे इतर ओबीसी जातींतही असंतोष होता. त्या असंतोषाचे नेतृत्व काही प्रबळ मराठ्यांनी केले. मराठा समाजातील एका गटाबरोबर काही ओबीसी जातींतील मतदारांनीही मनसेला एकगठ्ठा मते दिली तर काहींनी सेनेच्या उमेदवाराला पसंती दिली. तर मराठा समाजातील एका लहान गटाने राष्ट्रवादीला मतदान केले. बीडमध्ये मराठा विरुद्ध इतर सगळ्या ओबीसी जाती अशी लढत झाली. ती अगदी पक्षातीत झाली. अगदी थोडे मतदारसंघ असतील की जिथे जातीपातीचा प्रभाव फारसा जाणवला नाही. माढ्यात धनगर समाजाचे मोठे मतदान आहेे. पण त्यातील बहुतांशी मतदान शरद पवारांना झाले असावे. अन्यथा तीन लाखांवर मताधिक्य दिसले नसते. अर्थात सामाजिक प्रश्ानंबद्दल त्यांची भूमिका संशयातीत असल्यानेच जातीचे राजकारण तिथे निष्प्रभ ठरले असेल. पण अशी उदाहरणेही बोटावर मोजण्याइतपत आहेत. जातीपातीचे राजकारण राखीव झालेल्या मतदारसंघांतही मोठ्याप्रमाणात झाले. रामटेकमध्ये मेणबत्ती की अगरबत्ती, असा सांकेतिक भाषेत प्रचार झाला. बौद्ध समाजाचे लोक आंबेडकर जयंतीला मेणबत्त्या लावतात आणि हिंदू दलित देवदेवतांपुढे अगरबत्त्या लावतात. त्यामुळे बौद्ध उमेदवाराऐवजी हिंदू दलित उमेदवाराला मते द्या, असे सांगण्याचा प्रकार होता. अमरावतीत निळा गुलाल नको भगवा गुलाल पाहिजे, असा प्रचार झाला. जयभीम की रामराम, ही भाषा शिडीर्त झाली. थोडक्यात सांगायचे तर हिंदू मतदारांनी हिंदू दलित उमेदवारांना मते द्यावीत असे सांगून बौद्धांना एकटे पाडण्याचा सर्रास प्रयत्न झाला. यात बहुजन समाजातील प्रबळ जातीचा मोठा वाटा होता. एरवी पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात निवडणुका लढल्या जातात. उमेदवार योग्य की अयोग्य, यावरही त्या होतात. पण यावेळी फार मोठ्या प्रमाणात पक्ष आणि उमेदवारापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे, हे लक्षात घेऊन जाती जातीत राजकारण झाले. याला मराठ्यांसह कोणतीही जात अपवाद नाही. त्यामुळे बहुजन समाज ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. यातील अधाशी घटकांना बाजूला करून सामाजिक सामंज्यस्य निर्माण केले नाही तर म. फुल्यांनी मांडलेली बहुजन समाजाची ही संकल्पना इतिहासजमा झाली तर आश्चर्य वाटायला नको.

हिन्दुनी बळकावली जैन-बौद्ध मंदिरे.....!

मुस्लिमांनी अनेक हिन्दू  मंदिरे पाडून त्याजागी मशीदी बांधल्या असा हिंदुत्ववाद्यांचा  एक लाडका सिद्धांत आहे. बाबरी मशिदीच्या जागी आधी राम मंदिर होते, व बाबराने ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली असेही हे लोक छातीठोक पणे सांगत  असतात.

मुस्लिमांनी काय केले हे आपण थोड़ा वेळ बाजूला ठेवू. पण  खुद्द हिंदुत्ववाद्यांनी  भारतातील अनेक जैन व बौद्ध गुफा, लेणी,  मंदिरे चक्क बळकावली  व त्यांचे हिन्दूकरण केले या विषयाची चर्चा होणे फार गरजेचे आहे.

भारतात आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात आणि ५० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पाहिलेत, तर तुम्हाला  सगळ्यात जूने  अवशेष हे जैन किंवा  बौद्धांचेच दिसतील. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर बौद्ध लेणी दिसतात.   खुद्द पुणे जिल्ह्यातच कार्ले, भाजे, जुन्नर, लेण्याद्री  या ठिकाणी तुम्हाला प्राचीन बौद्ध लेणी दिसतील. याउलट हिंदूंची जी कांही 'जूनी' धार्मिक ठिकाणे आहेत,  ती फार नंतरची आहेत, आणि तीही बौद्धान्च्या लेण्यात घूसखोरी करून बनवण्यात आली आहेत.  याची कांही उदाहरणे म्हणजे खुद्द पुण्यातील पातालेश्वर लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी आणि लेन्याद्रीचा गणपती ही आहेत. अगदी अशीच स्थिती महाराष्ट्रभर आणि देशभर आहे.


पंढरपूरच्या विठ्ठलाचे  मंदिर मूळ जैन किंवा बौद्ध मंदिर असावे याचे अनेक पुरावे आहेत. इतकेच नव्हे तर कोल्हापूरच्या  महालक्ष्मीचे मंदिर हे मूळ पद्मावती देवीचे जैन मंदिर होते ही गोष्ट तुम्हाला कोणताही निष्पक्ष इतिहासकार सांगू शकेल. तुम्ही स्वत: कोल्हापूरला या मंदिरात गेलात आणि मंदिरातील शिल्पांचे बारकाईने निरीक्षण केलेत तर तुम्हालाही हे जैन मंदिर होते हे सहज समजू शकेल. तेथे असलेल्या जैन खाणा-खुणा बुजवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, ही गोष्ट हे जैन मंदिर होते असेच सिद्ध करते.

महाराष्ट्रातीलाच सातारा जिल्ह्यातील फलटन येथे जबरेश्वराचे मंदिर आहे. ते आधी जैन मंदिर होते हे तुम्ही स्वत: ओळखु शकता.

अशा कनव्हरटेड  मंदिरांची संख्या शेकडोंनी  आहे. आज हिन्दू मंदिरे म्हणून ओळखल्या  जाणा-या  कांही प्रसिद्द मंदिरांमध्ये जगन्नाथपुरी (ओरिसा, हे मूळ जैन मदिर होते व ते जैन धर्माचे यादवकुलीन तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते),  तिरुपती बालाजी (आंध्रा प्रदेश, हे देखील मूळ जैन मदिर होते व ते  तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते) व बद्रीनाथ (उत्तरांचल,   हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर  रु षभ यांचे मंदिर होते, आता ते शिव मंदिर आहे) ही मंदिरे आहेत.

बौद्ध गयेचे प्रसिद्द मंदिर बौद्धांचे असुनही आज देखील हिंदूंच्या ताब्यात आहे व ते त्यावरील आपला ताबा सोडायला तैयार नाहीत. 

बाबरी मशीद येथे अगोदर राम मंदिर होते याचे पुरावे हिंदुत्ववादी देवू शकले नाहीत. भाजप सरकारने कोर्टात जे पुरावे दिले ते तेथे जैन मंदिर होते याचे दिले! पुढे तेथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले, त्यांनाही  तेथे जैन अवशेषच  सापडले!


जैन व बौद्ध मंदिरांचे रूपान्तर हिन्दू मंदिरांत कसे झाले याच्या सुरस कथा आपल्याला शिवलीलामृत या पोथीत वाचायला मिळतील.
पांडव लेणी हा शब्द आपण ब-याचदा ऐकला-वाचला असेल. कांही पांडव लेणी आपण स्वत: बघितलीही असतील. ही  पांडव लेणी पांडवांनी  एका रात्रीत बनवली अशी एक भाकड कथा सांगितली जाते. त्या भाकडकथेचा अर्थ एवढाच की कोणीतरी एक रात्रीत त्या लेण्यात घुसखोरी करून ती आपल्या ताब्यात घेतली, आणि तिथे आपले देव बसवले.





-महावीर सांगलीकर

http://mahavichar.blogspot.com/2011/04/conversion-of-buddhists-temples.html


आभार
प्रशांत म. गायकवाड


आपला महाराष्ट्र शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता

आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील . भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत . हि लेणी म्हणजे बौद्ध भिक्शुंची राहण्याची ठिकाणे होती . हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत , असे सांगण्यात येते . परंतु विराटनगरी कोठे पांडवांचे राज्य कोठे ?

ब्राम्हणांनी भूलविण्यासाठी बुद्धाच्या नावाचा लोप केला.  

मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी हि पांडव लेणी असल्याचे सांगतात . 
इकडे  ‘पांडव’ कशाला आले होते ...!
पांडव दिल्लीच्या बाहेर ८० मैलाच्या पलीकडे कधी गेलेच नाहीत?
त्यांनी अलवार स्टेट मध्ये पंधराशे लेणी खोदली कशी?
त्यांच्याजवळ टीकास न्हवती की पावड न्हवत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार , खंड ६
पान क्रमांक :- ७४ व ७७


आभार
प्रशांत म. गायकवाड

दगडाचा देव, दगडाचे भक्त

विचार
स्वप्ना पाटकर


उपास-तापास, नवस आणि जागरणांचा ’सीझन’ आहे. जो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहे. कुणी बाबांच्या वाऱ्या करतात, तर कुणी दर्शनाचा अतिरेक करतात. उपासाच्या नावाखाली पोट फाटेस्तोवर उपासाचे पदार्थ खाल्ले जातात. जागृत मानल्या जाणाऱ्या स्थळांवर मोठमोठे नवस मागितले जातात. अवडीच्या गोष्टी सोडणे, मंदिरांना दान देणे, आठवड्यात एक चक्कर टाकणे हे सर्वही त्याचबरोबर सुरू होते. या सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवे, काहीतरी मिळावे म्हणून देवाला याप्रकारे मस्का मारला जातो. असेच भिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतो. गाडी, बंगला, चांगली नोकरी... ही यादी संपत नाही. मात्र भीक मागण्यात आयुष्य संपून जाते. आपले कुटुंब, ऑफिसमधील सहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक यांच्या मनाचा, विचारांचा, गरजांचा विचार करायला वेळच उरत नाही. दगडासमोर डोकं टेकण्यात तल्लीन झालेला मनुष्य जिवंत जीवांना विसरून जातो. अशाने देव अजिबात खूश होत नाही. दुसऱ्यांची मने दुखवणाऱ्यांवर देव खूष होईल तरी कसा! घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवासमोर उभे राहायला दोन मिनिटं नसणारे लालबागच्या राजासमोर सात तास राम्ग लावतात. याला भक्ती म्हणत नाहीत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले तेचे खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.

आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने सांभाळा, सर्वांशी प्रेमाने वागा, जगावर थोडा विश्वास ठेवा. ही खरी पूजा. चोर वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतात. दोन दु:खद प्रसंग घडले की, नशीब खोटे वाटू लागते. नजर जाईल तिथे खोटेपणा, लबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होते. मनात कपट, द्वेष, शंका आणि लबाडी ठेवून केलेली पूजा ही पूजा नसून वेडेपणाच आहे. स्वच्छ, शांत आणि प्रेमळ मन हा भक्तीचा पाया, बाकी सगळे नंतर. इमारतीचा चाळीसावा माळा कुणालाही भावेल, पण त्यासाठी पायाही मजबूत हवाच ना. पूजा, उपास, नवस वगैरे आयुष्याच्या इमारतीतला चाळीसावा माळा आहे. अत्यंत देखणा आहे, पण स्वशुद्धीचा पाया आधी नीट बाधुन घ्या. वाईटाने माखलेले मन घेऊन कोणत्याही देवळात गेलात, कितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी पदरी निराशाच येणार. बनवणाऱ्याला चालवता येते, देवाकडे ’करप्शन’ हा प्रकार चालत नाही. तिथे लाच देऊन चांगले आयुष्य घेता येत नाही. तिथे चालते फक्त मनुष्यप्रेमाचे नाणे.
देवाने बनवलेल्या सृष्टिवर व त्याने आकारलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्यांची इथे हुकुमत असते हे समजून घ्या.
देव दगडाचा जरी दिसत असला तरी दगडाचे भक्त बनू नका?
आभार
प्रशांत म. गायकवाड

एक स्वप्न पुन्हा नालंदा नांदण्याचे....!

विचार
सुरेश भटेवरा 

साऱ्या जगाला अभिमान वाटावे असे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आजच्या बिहारच्या भूमीत नालंदात होते. जगभरातून आलेले साडेआठ हजार विद्यार्थी  आणि दीड हजार विद्वान अध्यापक असणारे हे विद्यापीठ धर्मांध मोहम्मद बख्तियार खिलजी या आक्रमकाने पेटवले. इथला अपार ग्रंथ संग्रह तेव्हा सतत सहा महिने जळत होता. इथल्या गुरुजनांचा या आक्रमणात बळी तरी गेला किंवा ते परागंदा तरी झाले. 'नालंदा' या भारताला अभिमान वाटणाऱ्या इतिहासाची उजळणी करण्यासाठी त्याच जागी आता नालंदा विद्यापीठ नव्याने उभे राहते आहे. त्यासाठी पुढाकार घेताहेत नीतिशकुमार आणि अमर्त्य सेन. नालंदाला भेट देऊन टिपलेली ही निरीक्षणे.

...

दुपारचे दोन. सूर्य डोक्यावर तळपत होता. तापमान ४२ डिग्री असावे. वाटेत नालंदाचा फलक वाचला. मनात कुतूहल निर्माण झाले. नालंदा विद्यापीठाविषयी आजवर बरेच ऐकले होते. एकदा नालंदात जावे आणि विद्यापीठाचे अवशेष पहावेत, अशी उत्कंठा अनेक वर्ष मनात होती. लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी बिहारमधे हिंडत होतो. योग जुळला. ज्या भूमीने अनेक शतकांपूर्वी साऱ्या जगाला ज्ञानसाधनेची शीतल छाया दिली, त्या पवित्र जागेचे दर्शन घ्यावे, असे वाटले. वाट वाकडी करून नालंदात शिरलो. विद्यापीठाचा इतिहास समजावून घेण्यासाठी गाइड शंभुनाथ मिश्रांना सोबत घेतले. नालंदाच्या खंडहरात मिश्रांची रनिंग कॉमेंट्री ऐकताना, मनाचा प्रवास भूतकाळाच्या दिशेने सुरू झाला. पंधरा शतकांपूवीर्चे दृश्य थेट डोळ्यासमोर उभे राहिले.


जगाच्या ज्ञान परंपरेत बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे स्थान अतुलनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे जगातले पहिले विद्यापीठ. सलग आठ शतके साऱ्या विश्वात नालंदा ही ज्ञानदानाची तपोभूमी होती. केवळ भारतच नव्हे तर चीन, कोरिया, तिबेटसह जगातले हजारो विद्याथीर् ज्ञानार्जनासाठी इथे यायचे. प्रवेशासाठी त्यांना कडक प्रवेशपरीक्षा द्यावी लागे. दहापैकी दोनतीन विद्यार्थ्यांची निवड व्हायची. साहित्य, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, अंकगणित, दंडनीती, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, व्याकरण, चित्रकला, शिल्पकला, मंत्रविद्या, वेदविद्या तसेच बौद्ध आणि जैन संप्रदायांची शिकवण इथे दिली जायची. सत्याच्या शोधाची पहिली अट असते स्वातंत्र्य. हा नालंदाचा मानदंड. रोज इथे १०० व्याख्याने होत. एकाच वेळी ८५०० विद्यार्थी
, विविध कलांमध्ये पारंगत व्हायचे. त्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठात तब्बल दीड हजार अध्यापक होते. इथले अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापी होते. विविध कलासंस्कार शिकवणाऱ्या नालंदात सांप्रदायिकता नव्हती. रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन देखण्या इमारतींमध्ये ग्रंथालय होते. या परिसराला धर्मगंज म्हणत. जगातल्या अनेक विषयांची अलौकिक ज्ञानसंपदा इथे होती. नालंदा निवासी विद्यापीठ असल्याने विद्यार्थी आणि अध्यापकांसाठी हजारो स्वतंत्र खोल्या होत्या. या वसतिगृहांच्या भिंती रूंद असल्याने हिवाळ्यात खोल्या उबदार तर उन्हाळ्यात थंड राहात. निवासाबरोबर विद्यार्थ्यांना भोजन, कपडालत्ता, औषधोपचार सारे विनामूल्य मिळायचे. कनोजचे राजे हर्षवर्धन आणि पाल राजांचा उदार आश्रय विद्यापीठाला दीर्घकाळ मिळाला. दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या उत्पन्नातून अन् राजाश्रयातून विद्यापीठाचा खर्च चालायचा. इथले विद्यार्थी होतकरू होते आणि शिक्षक बुद्धिमान, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न होते. कौशल्यपूर्ण प्रशासन आणि राजाश्रया मुळे नालंदा विद्यापीठाची भरभराट होत गेली. आर्यदेव, शीलभद, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीतीर्, शांतरक्षित, कमलशील अशी विद्वानांची मालिकाच निर्माण झाली. न्यायशास्त्र ही नालंदा विद्यापीठाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी. जगभर अध्ययन आणि अध्यापनाची श्रेष्ठ परंपरा निर्माण करण्यात, नालंदाचा अर्थातच मोठा वाटा आहे. बाराव्या शतकापर्यंत ज्ञानदानाचा अखंड यज्ञ नालंदा विद्यापीठात सुरू होता.


नालंदाजवळ पावापुरीत भगवान महावीरांना केवलज्ञान प्राप्त झाले. जैन धर्माच्या या चोविसाव्या तीर्थंकराचे महानिर्वाणही पावापुरीतच झाले. महावीरांच्या निर्वाणानंतर ७५ वर्षांनी भगवान बुद्धाला नालंदा जवळच्या बोधगयेतच चैतन्याचा साक्षात्कार झाला. त्या शतकात भगवान महावीर आणि गौतम बुद्धाने नालंदा विद्यापीठाला अनेकदा भेट दिल्याचा इतिहास, पाली भाषेतल्या नोंदीत सापडला आहे. नालंदा विद्यापीठाच्या संस्कृतीवर जैन आणि बौद्ध संप्रदायांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव आहे, असे इथल्या खंडहरात वावरताना जागोजागी जाणवते. वस्तु संग्रहालयातही त्याचे अनेक मौल्यवान पुरावे आहेत. बाराव्या शतकात बौद्ध तत्वज्ञानाविरूद्ध पेटून उठलेल्या मोहम्मद बख्तियार खिलजी नामक आक्रमक युद्धखोराने, नालंदावर हिंसक हल्ला चढवला. विद्यापीठाला मिळणारा राजाश्रय ही तोपर्यंत संपुष्टात आला होता. बख्तियार खिलजीने विद्यापीठाचा विध्वंस केला. इथल्या ग्रंथालयाला आग लावली. या आगीत विद्यार्थी आणि अध्यापकांच्या सामुदायिक प्रयत्नातून निर्माण झालेली अलौकिक ज्ञानसंपदा, इथले ग्रंथ, सलग सहा महिने जळत होते. बुद्ध संप्रदायाचे अनेक प्रसारक आणि गुरू या हल्ल्यात ठार झाले अथवा परागंदा झाले.

ज्ञानाच्या शोधात हिमालय पार करून, पाहियान (इ.स. ४११)आणि ह्युएन त्संग (इ.स. ६११ ते ६४४) नालंदात आले. नालंदाच्या शिक्षण पद्धतीवर या चिनी तत्त्वज्ञांनी विपुल लेखन केले. कालांतराने ह्युएन त्संगच्या जीवनावर एक कादंबरी प्रसिद्ध झाली. ती तुफान गाजली, जगभर खपली अन् वाचली गेली. 'जनीर् टू द वेस्ट' या इंग्रजी ग्रंथाच्या अनेक आवृत्या निघाल्या. इतिहासकार म्हणतात, जागतिक ज्ञानपरंपरेत ब्रिटनच्या ऑक्सफर्ड, केंब्रिज अथवा अमेरिकेतल्या हार्वर्ड, स्टॅनफर्ड विद्यापीठांचे जसे स्थान आहे, त्याच दर्जाचे वैभव सलग आठ शतके नालंदा विद्यापीठाचे होते. ही परंपरा आणि वारसा भारताने टिकवला असता तर कदाचित देशाचा इतिहास बदलला असता.

डोंगराच्या पोटात दडलेल्या नालंदाचा ब्रिटीश व्हाईसराय कनिंगहॅम यांना १८६१ साली शोध लागला. या परिसराचे सलग दहा वर्ष १८७१ पर्यंत उत्खनन झाले. त्यात मोठी सभागृहे, बुद्धविहार, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मुदा, वसतिगृहे इत्यादींच्या स्वरूपात जणू खजिनाच सापडला. चीन, जपान, कोरिया, थायलंड, व्हिएतनामसह आशिया खंडाच्या अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भारतात डॉ. आंबेडकरांनी त्याचे पुनरूज्जीवन केले मात्र तोवर तो जवळपास लोपलेला होता. नालंदाचा ऐतिहासिक वारसा किती महान आहे, याची आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या बहुतांश नवबौद्धांना जाणीव नसावी, हे इथे लक्षात आले. 

बिहारमध्ये नेहेमीच या राज्याचे दोन चेहरे समोर येतात. राजकीयदृष्ट्या बिहार परिपक्व आणि जागरूक आहे, मात्र अलिकडे सामाजिक न्यायाचा झेंडा मिरवणाऱ्या नेत्यांनी झोटिंगशाही आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा उघड पुरस्कार केला. दांडगटांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली, इतकेच नव्हे तर त्यांच्या हाती सत्ताही सोपवली. या गैरव्यवहारामुळे राज्य बेशिस्त बनले. इतरांचे कायदेशीर हक्क हिरावण्याची वृत्ती वाढली आणि बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा विनाश ओढवला. मूळ बिहारची ओळख मात्र अशी नाही. इथल्या भूमीत प्रचंड ज्ञानलालसा आहे. स्वभावात धाडस आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रचंड कष्ट करायला बिहारी लोक घाबरत नाहीत. अनेकांच्या हाती कला आणि प्रखर बुद्धी आहे. आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षेत बिहारी विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी  सर्वाधिक असते. बेशिस्त वाटणाऱ्या भूमीत ज्ञानलालसेचा हा संस्कार नेमका कुठून आला? नालंदाच्या अवशेषांमधून तर हा प्रेरणास्त्रोत निरंतर वाहात नसावा?

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाच्या धतीर्वर 'इंडो एशियन इस्टिट्युट ऑफ लर्निंग चे स्वप्न पाहिले. नितीशकुमारांनी त्याला अनुसरून नालंदा विद्यापीठाचे सर्वार्थाने पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय तीन वर्षा पूर्वी  घेतला. जपान आणि सिंगापूरनेही यात सहभागी होण्याची इज्छा व्यक्त केलीय. विद्यापीठासाठी नोबेल पुरस्कार विजेते अर्मत्य सेन यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत आहे. नव्या विद्यापीठात विज्ञानाच्या विविध शाखा, इंजिनीअरिंग, वैद्यक, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्रे, भाषा, साहित्य आणि व्यवस्थापनाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा समितीचा मानस आहे. बौद्ध तत्त्वज्ञानासाठी स्वतंत्र विभागाखेरीज तत्त्वज्ञान, इतिहास आणि विविध धर्मांच्या तौलनिक अभ्यासाची अद्ययावत केंदे विद्यापीठात असतील. नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन अवशेषांजवळच ५०० कोटी खर्चून ४५० एकरांवर हे विद्यापीठ उभे राहील. जवळच एक खास टाऊनशिपही होईल. संस्कारांच्या आदानप्रदानाचे नालंदा पुन्हा आंतरराष्ट्रीय केंद बनावे, यासाठी बिहार सरकार आणि अर्मत्य सेन यांची समिती मनापासून मेहनत करते आहे. अर्थात विद्यापीठाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असल्याने संसदेला त्यासाठी खास कायदा मंजूर करावा लागेल. अर्मत्य सेन यांनी मध्यंतरी या प्रकल्पासाठी पंतप्रधान मनमोहन सिंगांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला तात्काळ संमती दिली. केंदात लवकरच नवे सरकार येईल. कायदेशीर सोपस्कार लवकर आटपले तर नालंदाचे पुनरूज्जीवन लवकर होईल, असे अर्मत्य सेन म्हणतात. अंधारलेल्या बिहारचे भवितव्य नालंदाच्या निमित्ताने उजळले तर साऱ्या देशालाही ते हवेच आहे!


आभार
प्रशांत म. गायकवाड


ड्रॅगन पॅलेस टेम्पल...अप्रतिम वास्तूकलेचा आनंद...!!!

लोकसत्ता , २६ एप्रिल २००९

धार्मिक आणि पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नागपूर शहराचे नाव कोरणारे कामठीतील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ विदर्भाच्या मुकुटातील लखलखता हिरा आहे.

‘हॉटस्पॉट’च्या संकल्पनेत चपखल बसणारी ही वास्तू अप्रतिम वास्तूकलेचा नमुना म्हणून विख्यात झाली आहे. नागपूर-जबलपूर मार्गावर नागपूरपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या ड्रॅगन टेम्पलची उभारणी दहा वर्षांपूर्वी करण्यात आली. २३ नोव्हेंबर १९९९ या दिवशी ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यटकांसाठी खुले झाले. भगवान गौतम बुद्धांच्या बौध्द धर्माला वाहिलेली शानदार वास्तू आता फक्त बौद्ध धर्मीयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सर्वच जाती-धर्माचे लोक या वास्तूची रचना अनुभवण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात.. आणि हेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या उभारणीचे यश आहे. ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांत विविध धर्माच्या ५० लाख पर्यटकांनी भेट दिलेली असून वार्षिक सरासरी ५ लाख पर्यटक येणारे विदर्भातील हे एकमेव स्थळ. ‘आर्किटेक्टरल मास्टरपीस’ याच शब्दात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे वर्णन करता येईल.
माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांचे १९९४ साली बीडी कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू असताना टोकियोतील मदर नारिको ओगावा सोसायटीच्या नारिका ओगावा यांची कामठीत योगायोगाने भेट झाल्यानंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारणीच्या प्रस्तावाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुप आले. मात्र, या वास्तूला नेमके काय नाव द्यावे, यावर प्रचंड खल झाला. जवळजवळ दीडशे नावे नजरेखालून घातल्यानंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे नाव निश्चित करण्यात आले. २६ महिन्यांमध्ये ५ कोटी रुपये खर्चून ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. दहा एकर जमिनीवर उभारलेली ही वास्तू नागपूरचे प्रख्यात इंजिनियर दिवं. पी.टी. मसे आणि आर्किटेक्ट आर.एम. गोडसे यांनी संयुक्तपणे डिझाईन केली होती. बौद्ध परंपरेतील सवरेत्कृष्ट प्रार्थना मंदिराच्या संकल्पनेला डोळ्यापुढे ठेवून त्यांनी याचा कच्चा आराखडा तयार केला. लोटस टेम्पल म्हणूनही याची ओळख जगभर आहे. विस्तीर्ण परिसरातील हिरवळ, सुंदर पुष्पांनी बहरलेली झाडे, आणि आकर्षक लँडस्केपिंगमुळे ही वास्तू भुरळ घालते. फुलझाडांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली असून वास्तूरचनेच्या सौदर्यात त्यामुळे भर पडली आहे. देखणे कंपाऊंड आणि संगमरवरी पथ पाहून मन थक्क होते. संगमरवरी पायऱ्या चढून ध्यान केंद्रात शिरल्यावर गौतम बुद्धांचा चंदनाचा दहा फूट उंचीचा पुतळा लक्ष वेधून घेतो. हे ध्यान केंद्र बौद्ध धर्मीयांचे पवित्र पूजास्थळ आहे. या परिसरात सुंदर ऑडिटोरियम आणि ग्रंथालयही असल्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना भेट देण्यासाठी ही अत्यंत योग्य जागा आहे. ऑडिटोरियमचा एक सेक्शन बौद्ध धर्माच्या भूतकाळातील सोनेरी दिवसांच्या आठवणी ताज्या करतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘बेस्ट कॉक्रिंट स्ट्रक्चर’ हा पुरस्कार ड्रॅगन पॅलेस टेम्पलने पटकावलेला आहे. हा नागपूर शहराचा मोठा सन्मान आहे. पर्यटनाच्या व्याख्येत धर्म-जात-पातीला स्थान नाही. एक सुंदर वास्तूरचना पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी काही तास ड्रॅगन पॅलेस टेम्पलला देण्यास मुळीच हरकत नाही. तुम्ही सहकुटुंब वर्षभरात केव्हाही या हॉटस्पॉटला भेट देऊ शकता. जाण्याचा मार्ग अत्यंत सोपा आहे. स्वत:चे वाहन असेल तर ठीकच, जर नसेल तर शहर बसेससुद्धा कामठीपर्यंत रोज जातात. जागतिक शांतता, सौहार्द आणि मैत्रीचा संदेश देणारे ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यटकांना हाक देत आहे..!







आभार
प्रशांत म. गायकवाड

भगवान बुद्ध.... सावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर....!

बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही...!!   संधर्भ  मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात दि २४ मे १९५६ रोजी डो बाबासाहेब यांनी केलेल भाषण    पुस्तक :- डो बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार , खंड ६ संपादक :- धनराज डाहाट   बुद्ध धरमावर बरेच लोक खोडसाळप...णे टीका करतात .त्यापैकी सावरकर एक होत .वास्तविक त्यांना म्हणायचे आहे हेच मला काळात नाही . बुद्ध हा वाइट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाइट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी .मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे.केसरीत प्रसिध्द केलेल्या ‘बौद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरछेद ‘ या लेखातून त्यांनी स्प्श्पणे सांगितलं नाही सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे ,त्यांना उत्तर देण्याची माझी हिम्मत आहे..   भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्शुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते.हे सावरकरांना माहित आहे काय ? सारीपुत्त मोग्ग्लायान्सारखे पंडित ब्राम्हण होते , सावरकरांनी हे  विसरू नये सावरकरांना मला अस प्रशन विचारायचा आहे कि पेशवे कोण होते , ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले ?   तेव्हां अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये . काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकरांनी आपल्या पोटातील नरक ओकले !    तेव्हां  कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे मी बुद्द धर्म स्वीकारणार ! तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्य्चाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली . परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल , ती कधी परत जाणार नाही . या अफाट सागराला भरती येईल , पण ओहोटी येणार नाही . 


आभार
प्रशांत म. गायकवाड