पानिपतावर अब्दाली आणि मराठ्यांच्या फौजा तळ देऊन होत्या. सायंकाळी अब्दाली मराठ्यांच्या छावणीचा अदमास घेत होता. मराठ्यांच्या तळावर जागोजागी चुली पेटवून स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्या हजारो चुलींचा जाळ बघून अब्दालीला प्रारंभी मराठ्यांची फौज संख्येने प्रचंड असावी, अशी धास्ती वाटली. त्याने बरोबरच्या हेरांना विचारले तेव्हा मराठा सैनिक चुलीवर भाकर्या भाजत असल्याचे त्याला समजले. त्यावर त्याने नवलाने विचारले, 'पण त्यासाठी हजारो चुली पेटवण्याची गरज काय?' माहितगारांनी तपशील पुरवला, ' या लोकांमध्ये खालच्या जातीच्या हातचे अन्न खात नाहीत. प्रत्येक जातीत अशी उतरंड असल्याने जो तो स्वतःचे अन्न स्वतः रांधून खातो' त्यावर अब्दाली आत्मविश्वासाने म्हणाला, 'बहोत खूब. मग उद्याचे युद्ध आपण नक्की जिंकणार. मरणाच्या दारात असतानाही जे लोक एकमेकांच्या हातची भाकरी खात नाहीत आणि एकत्र स्वयंपाक करु शकत नाहीत ते एकीने काय लढणार?'
No comments:
Post a Comment