Tuesday 24 May 2011

राष्ट्रीय दिनदर्शिका शके सवंत व बौद्ध संस्कृती

 
          मागच्या 2500 वर्षात बौद्ध संस्कृतीने भारताला व जगाला अनेक गोष्टींची देणगी दिलेली आहे. योग-शास्त्र, आयुर्वेद, आधुनिक शिक्षण-पद्धती, मार्शल आर्ट, स्थापत्य शास्त्र व मानसशास्त्र इत्यादी ज्ञानशाखा बौद्ध संस्कृतीतून निर्माण झालेल्या आहेत. तर राष्ट्रीय ध्वजावरील धम्मचक व चारही दिशेला धम्म गर्जना करणारे सिंह ही राज-मुद्रा बौद्ध  संस्कृतीची देणगी आहे. पण, भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका शके सवंत ही सुद्धा बौद्ध संस्कृतीची देणगी आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे ह्या दिनदर्शिकेशी आपला काही संबंध नाही, अशी भूमिका अनेक बौद्ध लोक मांडतात.
तसेच, बौद्धांची चळवळ भरकटविण्यासाठी किंवा नष्ट करण्याकरिता अनेक संघटना कार्यरत आहे. यांची कार्यपद्धती म्हणजे इतिहासाचे विदुपीकरण किंवा सामावून घेणे असे आहे. जसे प्राचीन बौद्ध लेण्यांचा बाजूला मूर्तीची स्थापना करणे व कालांतराने त्यावर कब्जा करणे. बुद्धगयेस महाबोधी विहारावर अजूनही असलेला गैर-बौद्धांचा ताबा, महाशिवरात्रीच्या दिवशी मुंबई परिसरात असलेल्या लेण्यास पूजा-पाठ करण्यास येणारा जन-समूह व 26 जानेवारीशी काहीही संबंध नसताना सरकारी कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी होणाऱया सत्यनारायणाची पूजा, हे याचे जिवंत उदाहरण आहेत.
शके सवंतची ऐतिहासिक पार्श्वभूमी : शके संवतची उदाहरण शक वंशातला सम्राट कनिष्क (78-101)ने राज्याभिषेकपासून केली. आणि आजही शके संवत व ग्रेगरियन दिनदर्शिकेत 78 वर्षाचे अंतर कायम आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मिर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशियापर्यंत होता. बघा : चित्र क्र.1 त्याच्या काळात चौथी धम्मसंगिती जालंधर किंवा काश्मिरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मुर्तीसुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वतची व भ. बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. (बघा : चित्र क्र. 2). सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा 400 फुट उंच होता. सम्राट कनिष्कामुळे बुद्धाच्या धम्मप्रसार मध्य आशिया व चीन या भागात झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जुनसारखे विद्धान व चरकसारखे वैद्य त्यांचे दरबारी होते. (संदर्भ :1. बौद्ध धर्म के 2500 वर्ष : राहुल सांकृत्यायन, 2. जगातील बुद्धधम्माचा इतिहास : मा.श. मोरे, पृ. 22-24; 3. Ancient and Medieval India : Prasad, Pg. 114-123)
दिनदर्शिकेचे प्रकार : तीन प्रकारच्या दिनदर्शिकेचे अस्तित्व आहे. पहिली ः सूर्यावर आधारलेली ग्रेगरीअन जी कार्यालयात वापरली जाते. या दिनदर्शिकेचा संबंध ख्रिस्ती संस्कृतीसोबत येतो. दुसरी : चंद्रावर आधारलेला म्हणजे हिजरी सवंत. या दिनदर्शिकेचा संबंध मुस्लिम संस्कृतीसोबत येतो. तर तिसरी दिनदर्शिका सूर्य व चंद्र यांच्यावर आधारलेली आहे. यात विकम सवंतचा ब्राह्मणी (हिंदू) तर शके सवंतचा संबंध बौद्ध संस्कृतीशी येतो. विक्रम सवंतला नेमके कुणी सुरू केले, याचा ऐतिहासिक दाखला मिळत नाही. शके सवंतला किंचित बदलून राष्ट्रीय दिनदर्शिकेचा दर्जा 1956ला देण्यात आला. तरीसुद्धा सार्वजनिक सुट्टीकरिता जुनाच शके सवंत वापरला जातो.
दिनदर्शिकेचा व बौद्ध संस्कृतीचा संबंध : बौद्ध संस्कृतीतील सर्व कार्यक्रम पौर्णिमा, अमावस्या व अष्टमीप्रमाणे ठरलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा, गुरू पौर्णिमा (पंच वर्गिय भिक्षुस धम्मदेसना), माघ पौर्णिमा, वर्षावास व धम्मचक्र प्रवर्तन दिवस या सर्वांच संबंध चंद्रावर आधारलेल्या दिनदर्शिकेशी येतो. बौद्ध परंपरेप्रमाणे काही ठळक घटना आणि त्यांचा दिनदर्शिकेशी संबंध पुढे दिला आहे. (संदर्भ : तथागतांच्या धम्मात पौर्णिमांचे महत्त्व : रा.पि. गायकवाड)
चैत्र पौर्णिमा (चित्त) : सुजाताचे भ. बुद्धास खिरदान, वैशाख पौर्णिमा (वेसाक्को) : भ. बुद्धांचा जन्म, 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती व 80व्या वर्षी महापरिनिब्बान, ज्येष्ठ पौर्णिमा (जेठ्ठ) : तपुस्स व भल्लुकाची धम्मदीक्षा, संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधीवृक्ष लावला, आषाढ पौर्णिमा (आसाळहो) : राणी महामायाची गर्भधारणा, राजपूत्र सिद्धार्थाचे महाभिनिष्कमण, सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच गुरू पौर्णिमा, वर्षावासाची सुरूवात, श्रावण पौर्णिमा (सावणो) : अंगुलीमालाची दीक्षा, भ. बुद्धांच्या महापरिनिब्बान नंतर पहिली धम्म संगितीची सुरूवात, भाद्रपद (पोठ्ठपादो) : वर्षावासचा कालावधी, अश्विन (अस्सयुजो) : पौर्णिमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्याकडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजयादशमी, बाबासाहेब आंबेडकर व 5 लाख लोकांची नागपुरला धम्मदीक्षा, कार्तिक पौर्णिमा (कार्तिको) : आधुनिक मूलगंधकुटी विहार, सारनाथला अनागरिक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्रात्प झालेल्या भगवंताच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेस भेट देतात, मार्गशिर्ष (मागसीरो) : पौर्णिमेस सिद्धार्थ गौतम यांची बुद्धत्व करण्यापूर्वीची राजा बिंबीसार सोबत पहिली भेट, पौष पौर्णिमा (पुस्सो) : राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा, माघ (माघो) पौर्णिमा : भ. बुद्धांची महापरिनिब्बनाची घोषणा, स्थविर आनंद यांचे परिनिब्बान, फाल्गुन (फग्गुनो) पौर्णिमा : बुद्धत्व प्राप्ती नंतर कपिलवस्तूस पहिली भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा.
स्पष्टपणे, बौद्ध संस्कृतीची नाळ चंद्रावर आधारित दिनदर्शिकेशी जुळलेली आहे. याच दिनदर्शिकेच रूपांतरण नंतर सम्राट कनिष्काने शके सवंत यात केला. तरीही बौद्ध दिनदर्शिका नाही, याचा बौद्ध संस्कृतीशी काहीही संबंध नाही; अशा अप्रचारास बळी पडू नये. तसेच, जर यावर कुणी दुसऱया संस्कृतीचा रंग चढवित असेल तर दक्षता घ्यावी. चैत्र शुल्क 1, 1933 (4 एप्रिल, 2011)ला शके सवंत प्रमाणे नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. तरी बौद्ध बांधवांनी हा बौद्ध परंपरेप्रमाणे साजरा करून संस्कृती जतन करावी.

राजेश पाटील
8097306700

2 comments:

Anonymous said...

भ. बुद्ध को किसने समझा है ? सबसे पहले बाबासाहब को ही समझ लेते।
आज बहुत सारे लोग बाबासाहब को समझने का दावा कर रहे है परंतु हर वक्त बाबासाहब के साथ धोखेबाज़ि कर रहे है दुसरो की छोड़ीए उनके खुद के बेटे ने उनके आखरी वंश ने भी उनके साथ प्रथम गद्दारी की ।
कांग्रेस के साथ युती करके जब RPI और कांग्रेस की पहली युती हुई तब 521 मे से एक जगह RPI को और 520 कांग्रेस को मिली। और आज भी लोग बाबासाहब का आंदोलन नही इन लोगो का बचा हुआ कार्य पूरा कर रहे है ।मिसाल के तौर पर
जैसे बाबासाहब का खून उनका वंश प्रकाश आंबेडकर पूना पँक्ट का समर्थन करता है बल्कि बाबासाहब ने पूना पँक्ट खत्म करना चाहिए इसलिए 1948 मे जेल भरो आंदोलन किया था । क्या प्रकाश आंबेडकर को इतना भी नही पता होगा की की बाबासाहब ने पूना पँक्ट को खत्म करने के लिए जेल भरो आंदोलन किया था? आज उनके ही वंशज उनके साथ धोकेबाजी कर रहे है तो साधारण आदमी का क्या? वो तो अपने स्वार्थपुर्ति के लिए महापुरुषो के विचारो का गला घोट ही रहे है आज फेसबुक पे भी ऐसे लोग शामिल हो गए है जो अपने आप को आंबेडकरवादी होने का दावा करते है। ऐसे लोगो को सबक सिखाना जरूरी है ।

Anonymous said...

भ. बुद्ध को किसने समझा है ? सबसे पहले बाबासाहब को ही समझ लेते।
आज बहुत सारे लोग बाबासाहब को समझने का दावा कर रहे है परंतु हर वक्त बाबासाहब के साथ धोखेबाज़ि कर रहे है दुसरो की छोड़ीए उनके खुद के बेटे ने उनके आखरी वंश ने भी उनके साथ प्रथम गद्दारी की ।
कांग्रेस के साथ युती करके जब RPI और कांग्रेस की पहली युती हुई तब 521 मे से एक जगह RPI को और 520 कांग्रेस को मिली। और आज भी लोग बाबासाहब का आंदोलन नही इन लोगो का बचा हुआ कार्य पूरा कर रहे है ।मिसाल के तौर पर
जैसे बाबासाहब का खून उनका वंश प्रकाश आंबेडकर पूना पँक्ट का समर्थन करता है बल्कि बाबासाहब ने पूना पँक्ट खत्म करना चाहिए इसलिए 1948 मे जेल भरो आंदोलन किया था । क्या प्रकाश आंबेडकर को इतना भी नही पता होगा की की बाबासाहब ने पूना पँक्ट को खत्म करने के लिए जेल भरो आंदोलन किया था? आज उनके ही वंशज उनके साथ धोकेबाजी कर रहे है तो साधारण आदमी का क्या? वो तो अपने स्वार्थपुर्ति के लिए महापुरुषो के विचारो का गला घोट ही रहे है आज फेसबुक पे भी ऐसे लोग शामिल हो गए है जो अपने आप को आंबेडकरवादी होने का दावा करते है। ऐसे लोगो को सबक सिखाना जरूरी है ।